Premanand Maharaj: 'घोर कलियुग येणार, नात्यांच्या मर्यादा संपणार'; प्रेमानंद महाराजांनी सांगितले कोणकोणती दुःखे भोगावी लागणार

भक्ताचा प्रश्न ऐकून प्रेमानंद महाराज म्हणाले की, "कलियुगाचा परिणाम आता हळूहळू दिसू लागला आहे. बहीण आणि मुलगी यांमधील फरक मिटून जाईल.
Premanand Maharaj
Premanand Maharajfile photo
Published on
Updated on

Premanand Maharaj

वृंदावन : "महाराज, कलियुग खरंच इतके वाईट असेल का? आपल्या माणसांवरही विश्वास उरणार नाही का? मुलांवर आणि नातेवाईकांवर विश्वास ठेवणे आता कठीण होणार का?" भक्ताच्या या प्रश्नावर धर्मगुरू प्रेमानंद महाराज यांनी कलियुगावर भाष्य केले आहे.

काय म्हणाले प्रेमानंद महाराज?

भक्ताचा प्रश्न ऐकून प्रेमानंद महाराज म्हणाले की, "कलियुगाचा परिणाम आता हळूहळू दिसू लागला आहे. आज ज्या गोष्टी क्वचितच घडतात, भविष्यात त्या सामान्य होऊ शकतात. वडिलांकडून मुलांचे शोषण, जवळच्या व्यक्तींकडून मिळणारे दुःख आणि नात्यांमधील विश्वासाचा भंग, ही सर्व कलियुगाची लक्षणे आहेत. हा काळ हळूहळू प्रत्येक नात्यावर, प्रत्येक संबंधावर आणि समाजाच्या प्रत्येक स्तरावर आपला परिणाम दाखवेल. जे आज दुर्मिळ वाटते, ते उद्या सामान्य असू शकते."

Premanand Maharaj
Premanand Maharaj: मृत्यूनंतर सगळी नाती तुटतात? प्रेमानंद महाराज काय म्हणतात?

नात्यांची मर्यादा संपून जाईल

प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की, "भविष्यात बहीण आणि मुलगी यांमधील फरक मिटून जाईल. लोक लोभ आणि स्वार्थात इतके बुडून जातील की नात्यांची मर्यादा संपून जाईल. माणूस केवळ स्वतःच्या लाभासाठी आणि सुखासाठी काम करेल. निसर्ग देखील या बदलाचा बळी ठरत आहे. नद्या आता पूर्वीसारख्या स्वच्छ आणि जीवनदायिनी राहिलेल्या नाहीत. वृंदावनसारख्या पवित्र ठिकाणी परिक्रमा केल्यानंतर तहान लागली तर बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. एकेकाळी ज्या गंगेचे पाणी अमृतासमान होते, आज तिची चव आणि शुद्धता हरवत चालली आहे."

कलियुगात वाचण्यासाठी काय करावे?

प्रेमानंद महाराजांनी सांगितले की, या कठीण काळात केवळ 'भगवंताचे नामस्मरण' आपल्याला पवित्र आणि सुरक्षित ठेवू शकते. नामस्मरणाने मन शांत होते आणि आत्मा मजबूत होतो. हाच तो उपाय आहे जो आपल्याला कलियुगातील वाईट गोष्टी, पाप आणि लोभापासून वाचवू शकतो.

महाराजांनी असेही स्पष्ट केले की, नामस्मरण केल्याने केवळ आपल्या मन आणि शरीराला शांती मिळते असे नाही, तर आपण समाज आणि कुटुंबातील आपली कर्तव्ये पार पाडण्यासही सक्षम होतो. नामजप, ध्यान आणि भगवंताचे स्मरण हेच आजच्या काळातील सर्वात मोठे शस्त्र आहे, जे आपल्याला कलियुगाच्या अंधकारमय परिस्थितीतून प्रकाशाचा मार्ग दाखवू शकते.

Premanand Maharaj
Makar Sankranti 2026: तिथीचा गोंधळ! यंदाची मकर संक्रांत १४ की १५ जानेवारीला... जाणून घ्या कधी साजरी करायची

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news