PM Narendra Modi
PM Narendra Modi x

India Pakistan Ceasefire: शस्त्रसंधीनंतरही भारताचा पाकिस्तानवर दबाव कायम; 'या' 5 निर्णयांमध्ये अजिबात माघार नाही!

India Pakistan Ceasefire: शांतता ही केवळ गोळीबार थांबल्याने नव्हे, तर दहशतवाद संपवण्यानेच शक्य आहे असा संदेशच जणू भारताने पाकिस्तानला दिला आहे.
Published on

India Pakistan Ceasefire:

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली. या सर्व पावलांचा उद्देश पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे पाडणे आणि दहशतवादाविरुद्ध कठोर संदेश देणे हा होता.

आता शस्त्रसंधी (सीझफायर) झाल्यानंतरही भारताने आपल्या पाच प्रमुख निर्णयांमध्ये कोणतीही शिथिलता आणलेली नाही. जाणून घेऊया त्या निर्णयांविषयी...

1. सिंधू जल वाटप करार स्थगित

भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिली. हा करार ‘अभ्यासाच्या स्थितीत’ ठेवण्याचा निर्णय घेतला.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला पाठबळ पूर्णपणे थांबवत नाही, तोपर्यंत हा करार पुन्हा कार्यरत केला जाणार नाही. हे पाऊल भारताच्या पाणीसंपत्तीवर सार्वभौम अधिकार असल्याचा भाग म्हणून पाहिली जात आहेत.

PM Narendra Modi
DRDO Robot Soldier: सीमेवर लढणार रोबोट जवान; पुण्यातील प्रयोगशाळेत सुरू आहे निर्मिती, कसा असेल हा रोबोट? जाणून घ्या...

2. व्यापार बंद – आर्थिक नातेसंबंध थांबले

भारताने पाकिस्तानसोबतचा सर्व व्यापारी व्यवहार स्थगित केला आहे. "ज्यावेळी सीमेपलीकडून देशात होणारा दहशतवाद थांबेल, त्यानंतरच आर्थिक नातेसंबंध सुरू होतील," अशी भारताची स्पष्ट भूमिका आहे. सीझफायरनंतरही व्यापार सुरु करण्याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही.

3. हवाई क्षेत्र बंद – पाकिस्तानच्या विमानांना भारतात नो एन्ट्री

भारताने पाकिस्तानच्या नोंदणीकृत, चालवलेल्या किंवा भाड्याने घेतलेल्या कोणत्याही विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. या निर्णयाचा उद्देश पाकिस्तानवर धोरणात्मक आणि आर्थिक दबाव निर्माण करणे हाच आहे.

PM Narendra Modi
India Pakistan Ceasefire: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स यांचा थेट पंतप्रधान मोदींना फोन; दोघांमध्ये गुप्त संवाद...

4. पाकिस्तानी कलाकार आणि कंटेटवर बंदी

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म्सना पाकिस्तानमधील कोणताही कंटेट त्वरित हटवण्याचा आदेश दिला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, देशाच्या सुरक्षेसाठी ही पावले महत्त्वाची मानली गेली आहेत.

तसेच ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) पाकिस्तानच्या कलाकारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. याशिवाय अनेक पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडियावरील अकाउंट्स (उदा. हानिया आमिर, फवाद खान, माहिरा खान, अली जफर इत्यादी) भारतात बंद करण्यात आली आहेत.

‘अबीर गुलाल’ हा फवाद खान अभिनीत हिंदी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार होता, पण त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

5. पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा सेवा बंद – बॉर्डर सील

भारत सरकारने सर्व प्रकारचे व्हिसा पाकिस्तानच्या नागरिकांसाठी रद्द केले असून नवीन व्हिसा सेवा थांबवली आहे. काही विशेष श्रेणी वगळता (उदा. हिंदू व शीख अल्पसंख्यांक), सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा त्वरित रद्द करण्यात आले आहेत.

तसेच अटारी-वाघा सीमारेषा सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आला आहे.

PM Narendra Modi
India Pakistan Conflict: पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता अहमद चौधरी आहे दहशतवाद्याचा मुलगा; ओसामा बिन लादेनला दिला होता अणुबॉम्बचा फॉर्म्युला...

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची धोरणात्मक भूमिका ही केवळ सीमारेषेवरील गोळीबार थांबवण्यापुरती मर्यादित नसून, दहशतवादास पाठबळ देणाऱ्या देशावर बहुआयामी दबाव टाकण्याची आहे.

सीझफायर हे एक सामरिक पाऊल असले तरीही, भारताच्या या कठोर उपाययोजनांतून पाकिस्तानला एक स्पष्ट संदेश दिला गेला आहे. शांतता ही केवळ गोळीबार थांबल्याने नव्हे, तर दहशतवाद संपवण्यानेच शक्य आहे असा तो संदेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news