Premanand Maharaj: बेडवर बसून किंवा अस्वच्छ ठिकाणी देवाचे नाव घेतल्यास पाप लागते का? काय सांगतात प्रेमानंद महाराज?

Premanand Maharaj viral video: अनेकांच्या मनात एक प्रश्न नेहमी असतो की, प्रत्येक ठिकाणी किंवा कोणत्याही अवस्थेत देवाचे नाव घेता येते का? याच प्रश्नावर धर्मगुरू प्रेमानंद महाराज यांनी अत्यंत मार्मिक मार्गदर्शन केले आहे.
Premanand Maharaj
Premanand Maharajfile photo
Published on
Updated on

Premanand Maharaj viral video:

वृंदावन: अनेकांच्या मनात एक प्रश्न नेहमी असतो की, प्रत्येक ठिकाणी किंवा कोणत्याही अवस्थेत देवाचे नाव घेता येते का? विशेषतः शौचालय किंवा बेडवर बसून नामस्मरण करण्याबाबत लोकांमध्ये मोठी साशंकता असते. याच प्रश्नावर धर्मगुरू प्रेमानंद महाराज यांनी अत्यंत मार्मिक मार्गदर्शन केले आहे.

प्रेमानंद महाराज यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिला भक्ताने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महाराजांनी स्पष्ट केले की, 'नाम जप' आणि 'गुरुमंत्र' जपण्याचे नियम वेगवेगळे आहेत आणि दोघांसाठी वेगवेगळ्या मर्यादा मानल्या जातात.

Premanand Maharaj
Premanand Maharaj: कलियुगात ७ जन्म तोच पती मिळू शकतो का? प्रेमानंद महाराजांनी सांगितलं पुनर्जन्माचं रहस्य!

अस्वच्छ ठिकाणी नामस्मरण करावे का?

महिला भक्त विचारते की, बेडवर बसून नामस्मरण करणे योग्य आहे का? यावर उत्तर देताना प्रेमानंद महाराजांनी सांगितले की, "हो, असे करता येते. अगदी शौचालयात बसूनही देवाचे नाव घेता येते." यासाठी त्यांनी शास्त्रातील श्लोकाचा आधार दिला आहे. 'अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा। यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः॥' अर्थात, व्यक्ती अपवित्र असो वा पवित्र, कोणत्याही परिस्थितीत जर ती देवाचे स्मरण करते, तर ती आतून आणि बाहेरून पवित्र होते."

पुढे प्रेमानंद महाराज सांगतात की, "मात्र, गुरुमंत्राच्या जपाबाबत काही नियम आहेत. ज्या बेडवर गृहस्थाश्रमाचे (संसाराचे) पालन केले जाते, तिथे बसून गुरुमंत्राचा जप करू नये. तसेच, शौचालयात किंवा कोणत्याही अपवित्र अवस्थेत गुरुमंत्राचा जप करणे वर्जित मानले जाते. परंतु, देवाचे नाव घेणे (नामस्मरण) या नियमांच्या पलीकडे आहे. नामस्मरण कोणत्याही परिस्थितीत केले जाऊ शकते. मग तुम्ही शौचालयात असा किंवा बेडवर बसलेले असा. नामस्मरणावर कोणतेही बंधन नसते, कारण ते स्वतःच माणसाला पवित्र करणारे मानले गेले आहे. याचा अर्थ असा की, आपण प्रत्येक परिस्थितीत नामस्मरण करू शकतो कारण त्यामुळे आपले मन आणि आत्मा शुद्ध होतो, जे आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाते."

Premanand Maharaj
Premanand Maharaj: 'घोर कलियुग येणार, नात्यांच्या मर्यादा संपणार'; प्रेमानंद महाराजांनी सांगितले कोणकोणती दुःखे भोगावी लागणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news