![IndiGo flight](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F05%2FUntitled-design-T-.-1-278.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची माहितीने आज (दि.२८) सकाळी विमानतळावर खळबळ उडाली. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच आपत्कालीन दरवाजातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मात्र विमानात बॉम्ब ही अफवाच असल्याचे सीआयएसएफच्या तपासात उघड झाले आहे.
आज पहाटे ५.३५ वाजता दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली होती. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच तातडीन विमान थांबवण्यात आले होते. सर्व प्रवाशांना इमर्जन्सी गेटमधून सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर विमानाला तपासणीसाठी आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. विमान सुरक्षा आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सीआयएसएफच्या तपासात टिश्यू पेपरवर बॉम्ब लिहिल्याची माहिती उघड झाली. यानंतर विमानतळावरील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हेही वाचा :