CBSE question : समाजशास्त्र पेपरमधील प्रश्नावर 'सीबीएसई'ने व्यक्त केली दिलगिरी, संबंधितांवर होणार कारवाई
पुढारी ऑनलाईन
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( सीबीएसई ) बारावी बोर्डाच्या समाजशास्त्राच्या प्रश्नपत्रीकेत विचारलेल्या एका प्रश्नावरुन ( CBSE question ) वाद निर्माण झाला आहे. या प्रश्नावरुन ‘सीबीएसई’ बोर्डाने माफीही मागितली आहे. मात्र या प्रश्नाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
२००२ मधील गुजरातमधील हिंसाचारावर प्रश्न
‘सीबीएसई’ बारावी बोर्डाच्या पहिल्या सत्रातील समाजशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये प्रश्नावरुन ( CBSE question ) प्रश्न क्रमांक २३ होता की, कोणाचे सरकार सत्तेत असताना २००२ मध्ये गुजरातमध्ये मुस्लिमविरोधी हिंसाचार झाला। या प्रश्नाच्या उत्तरासाठी भाजप, काँग्रेस, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन असे चार पर्याय देण्यात आले होते. यापैकी एक पर्याय विद्यार्थ्यांना निवडायचा होता. या प्रश्नावरुन वाद झाल्यानंतर याची गंभीर दखल सीबीएसईने घेतली.
CBSE question : प्रश्न चुकीचा : सीबीएसई बोर्डाने व्यक्त केली दिलगिरी
समाजशास्त्र विषयाच्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न चुकीचा होता. हा प्रश्नच सीबीएसईच्या मागदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारा ठरला आहे.आम्ही या चुकीची दखल घेतली असून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा खुलासा करत या प्रश्नावर सीबीएसईने ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली आहे.
A question has been asked in today’s class 12 sociology Term 1 exam which is inappropriate and in violation of the CBSE guidelines for external subject experts for setting question papers.CBSE acknowledges the error made and will take strict action against the responsible persons
— CBSE HQ (@cbseindia29) December 1, 2021
हेही वाचलं का?
- Nashik Farmes : अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांसह कांदा पिकाला फटका
- param bir singh suspension : परमबीर सिंग यांच्या निलंबन आदेशावर मुख्यमंत्र्यांनी केली स्वाक्षरी?
- Madan Patil Sangli : जो मैं बोलता हूं, वो मैं करता हूं – मुत्सद्दी राजकारणी मदन पाटील