राजस्थानमधील भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबद्दल बोलताना काँग्रेस नेते आणि राजस्थानचे काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, निकाल लागून आता सात दिवस झाले आहेत. एवढ्या काळात भाजप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू शकत नाही. जर काँग्रेसने एवढ्या काळात मुख्यमंत्र्यांची निवड केली नसती, तर भाजपने ओरड केली असती. गोगामेडी प्रकरणात मला कागदपत्रांवर सही करावी लागली. हे नवीन मुख्यमंत्र्यांनी करायला हवे होते. त्यांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. असेही गेहलोत म्हणाले. ( BJP's Chief Minister)