Chandrayaan-3 : चंद्राच्या कक्षेतील १०० कि.मी.चा टप्पा गुंतागुंतीचा : ‘इस्रो’ची माहिती
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चांद्रयान-3 चा प्रवास सुस्थितीत सुरू आहे. हे यान चंद्राच्या कक्षेपासून 100 कि.मी. अंतरावर पोहोचल्यावर मात्र आव्हानात्मक आणि अडचणीचा टप्पा सुरू होणार असल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली.
14 जुलै रोजी चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. चांद्रयानाने पृथ्वीची कक्षा ओलांडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. या यानाने चंद्रावरील पृष्ठभागाची छायाचित्रेही रविवारी पाठविली आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना सोमनाथ म्हणाले की, सध्या चांद्रयान-3 चंद्रापासून 170 कि.मी.×4,313 कि.मी. अंतरावरील कक्षेत पोहोचले आहे. 9 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट रोजी हे यान चंद्रापासून 100 कि.मी. अंतरावरील कक्षेत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. हा टप्पा खूप गुंतागुंतीचा असणार आहे.
हेही वाचा :
- Critical Phase of Chandrayaan-3 : चंद्रयान-३ मोहिमेचा सर्वांत महत्वाचा टप्पा ९ ऑगस्ट पासून सुरु होईल – इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ
- Russia-Ukraine War : रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला; ५ युक्रेनियन ठार, ३१ जखमी
- TESLA New CFO : टेस्ला कंपनीत मोठा बदल! किर्खोर्न यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचा नवा वित्तीय प्रमुख