

महिलांसोबत हिंसाचार करणार्यांसोबत पोलीसांची हातमिळवणी केली होती. पोलिसांनीच महिलांना जमावाच्या स्वाधीन केले हे स्पष्ट आहे. पोलिसांनी जे केले तेच जमावाने केल्याचे सिब्बल म्हणाले. तर, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास होत असेल, तर केंद्राला कुठलाही आक्षेप नाही, असे सॉलिसिटर जनरल मेहतांनी स्पष्ट केले.
३ मे रोजी जेव्हा मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाला त्यानंतर असे किती गुन्हे दाखल करण्यात आले? असा सवाल सरन्यायाधीशांनी विचारला. यावर केंद्राच्या स्थितीदर्शक अहवालाचा दाखला देत वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी ५९५ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली. यातील लैंगिक अत्याचार, जाळपोळ तसेच हत्येशी संबंधीत गुन्ह्यासंबंधी कुठलीही स्पष्टता नसल्याचे जयसिंह यांनी स्पष्ट केले.