भुवनेश्वर; वृत्तसंस्था : जगन्नाथ पुरी मंदिरातील रत्नांचा खजिना 39 वर्षांपासून बंद आहे. गेल्या वेळी तो अखेरचा 1984 मध्ये उघडण्यात आला होता. तिजोरीत 150 किलो सोने आणि 258 किलो चांदी आहे. खजिना आणि तिजोरी उघडावी आणि या संपत्तीचे लेखापरीक्षण करावे, अशी भाजपसह आणि काँग्रेसने केली आहे. ओडिशा हायकोर्टानेही या प्रकरणात राज्य सरकारकडून 10 जुलैपर्यंत उत्तर मागवले आहे. (Puri Jagannath Temple)
तिजोरीचा वाद काय?
रत्न भंडार राज्य सरकार (बिजू जनता दल) का उघडत नाही, या प्रश्नावर भंडाराच्या आतल्या खोलीची चावी मिळत नसल्याचे कारण सरकार सांगत आहे. आता राज्य सरकारला 10 जुलै रोजी ओडिशा उच्च न्यायालयात उत्तरे द्यायची आहेत. (Puri Jagannath Temple)
7 राज्यांत 60 हजार एकरवर जमीन
तिजोरीची मूळ चावी गेली कुठे? डुप्लिकेट चावी आली कुठून? हायकोर्टाच्या आदेशानंतरही तपास पथकाला आतल्या खोलीत का जाऊ दिले नाही? आतली खोली उघडत का नाही? सोने-चांदी गायब केले की काय?
– पितांबर आचार्य, प्रवक्ता, भाजप
अधिक वाचा :