काँग्रेस नेतृत्वाचा लोकांमध्ये प्रभाव नाही; गुलाम नबी आझाद यांची टीका
पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहरुजी, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी हे राजकारणात झालेला पराभव सहन करु शकत होते. त्यांच्याकडे ती सहनशक्ती होती. त्यांना लोकांचा पाठिंबा होता. लोक त्यांचा आदर करत होते. काही कालावधीनंतर ते पुन्हा आपल्या कार्याने जनतेचा विश्वास संपादन करत होते. मात्र, सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाचा लोकांवर कोणताही प्रभाव नाही, अशी टीका डेमॉक्रेटिक आझाद पार्टीचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.
Nehru ji, Rajiv Gandhi, Indira Gandhi could bear the shock, they had endurance, they had public support and respect and with their work over a period of time, they could rebound. Current Congress leadership has no influence over people: Democratic Progressive Azad Party chief… pic.twitter.com/4m6uAOXoa4
— ANI (@ANI) April 4, 2023