मोठी दुर्घटना : चंबळ नदीत बोट बुडाली, १७ जण बुडले, तिघांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली. जिल्ह्यातील चंबळ नदीत भाविकांची बोट बुडून १७ जण बुडाले. यातील तिघांचा मृत्यू झाला असून, चार भाविक बेपत्ता असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. बुडालेले सर्व भाविक हे शिवपुरी जिल्ह्यातील आहेत.
शिवपुरी जिल्ह्यातील सिलाईचौन गावात राहणारे कुशवाह समाजाचे १७ भाविक शिवपुरीहून करौली माता मंदिराच्या दर्शनासाठी पायी जात होते. चंबळ नदी ओलांडण्यासाठी त्यांनी बोटेतून प्रवास केला. मुरैना जिल्ह्यातील टेंटारा पोलीस स्टेशन हद्दीतील रायडी-राधेन घाट येथे भाविक चंबळ नदी ओलांडत असताना बोट बुडलाी. १७ भाविक बुडाले. यातील ७ जण पोहून काठावर आले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर गोताखोरांनी एका महिलेसह तीन जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. अद्याप ७ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चंबळ नदीत झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाला चंबळ नदीत बचावकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून (सीएमओ) बचाव आणि आवश्यक मदतीचे निरीक्षण केले जात आहे.
हेही वाचा :
- Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचं ‘महिलांच्या अपूऱ्या स्वच्छतागृहाबाबत’ सरकारला पत्र; म्हणाल्या…
- Imran Khan : इम्रान खान यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात, …नंतर इम्रान यांचे ट्विट म्हणाले,
- Amit Shah : ‘ईडी-सीबीआयचे कामकाज निष्पक्ष; आक्षेप असल्यास न्यायालयात आव्हान द्या’