नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशात एकूण 4033 आमदार आहेत. सन 2014 मध्ये काँग्रेसचे 658 म्हणजेच 24 टक्के आमदार होते, आता ही संख्या 16 टक्केवर आली आहे. देशातील 5 राज्यांत तर काँग्रेसचा एकही आमदार नाही. नागालँडच्या निकालानंतर येथील भोपळा फुटण्याची काँग्रेसची आशाही मावळली. (Congress MLA)
एकही जागा या राज्यात काँग्रेसला जिंकता आली नाही. काँग्रेसचा सूर्य पूर्वेलाही अस्ताकडे गेला आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या निकालांनी काँग्रेसची निराशा केली आहे. त्रिपुरात मात्र काँग्रेस भोपळा फोडण्यात यशस्वी ठरली. निकालाअंती या राज्यात 0 वरून काँग्रेसची सदस्यसंख्या 3 वर गेली आहे. मेघालयात मात्र अधोगती वाट्याला आली. काँग्रेसच्या या राज्यात 21 जागा होत्या. त्या 5 वर आल्या आहेत. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप त्रिपुरामध्ये बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन करणार आहे, तर उर्वरित दोन्ही राज्यांतून त्यासाठी युती करणार आहे. मोदींच्या कार्यकाळात देशातील एकूण भाजप आमदारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आहे. (Congress MLA)
2014 नंतर यांनी सोडली काँग्रेस
अधिक वाचा :