Love quadruple in Bihar : २ महिला एकमेकींच्या पतीच्या प्रेमात पडल्या आणि बांधली लग्नगाठ, बिहारमधील घटना | पुढारी

Love quadruple in Bihar : २ महिला एकमेकींच्या पतीच्या प्रेमात पडल्या आणि बांधली लग्नगाठ, बिहारमधील घटना

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील एक घटनेची चर्चा सगळीकडे सुरु आहे. दोन महिला एकमेकींच्या पतींच्या प्रेमात पडल्या. एवढ्यावरच न थांबता त्यांनी एकमेकींच्या नवऱ्यासोबत लग्नही केले. दोघांनीही एकमेकांची मुले स्वीकारली. बिहारच्या खागरिया येथे त्यांनी काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली आहे.

नीरज कुमार सिंह आणि रुबी देवी यांनी २००९ मध्ये लग्न केले होते. त्यांना दोन मुले आणि दोन मुली अशी एकूण चार अपत्य आहेत. रुबी नंतर मुकेश कुमार सिंह नावाच्या दुसर्‍या विवाहीत पुरुषाच्या प्रेमात पडली. मुकेश हा तिच्या आई -वडिलांच्या घराजवळ राहत होता. आपल्या पतीपासून विभक्त होऊन रूबीने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुकेश सोबत लग्न केले. लग्नानंतर तिने तिची तीन मुले आपल्यासोबत नेली तर एका मुलीला पहिला पती नीरजकडे ठेवले.

योगायोग असा की, मुकेशच्या पत्नीचे नाव देखील रुबी देवी होते. काही दिवसांनी नीरजला रुबी (मुकेशची पत्नी) बद्दल कळाले. त्याने तिच्याशी ओळख वाढवली. दोघेही फोनवर बोलू लागले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. १८ फेब्रुवारी रोजी त्यांनी कोर्टात लग्न केले. नीरजने मुकेशची मुलांनादेखील स्वीकारले. दोन्ही नवीन जोडपी आता मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button