पश्चिम बंगालमध्ये 'अल कायदा'चे दोन संशयित दहशतवादी जेरबंद
पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील दहशवाद विरोधी दलाने (एसटीएफ) दहशतवादी संघटना अल कायदाच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्याच्याकडे आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
२४ परगना जिल्ह्यातील खारीबाडी परिसरात अल कायदाच्या संपर्कात असलेले संशयित दहशतवादी असल्याची माहिती ‘एसटीएफ’ला मिळाली होती. त्यानुसार अब्दुर रकीव आणि काजी अहसानुल्लाह या दोघांना अटक करण्यात आली. अब्दुर हा दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील गंगारापूर येथील रहिवासी आहे. तर काजी अहसानुल्लाह हा हुगली जिल्ह्यातील आरामबाग येथील आहे.
दोघाही संशयिताकडून देशविरोधी कारवायाचे संकेत देणारे आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. या दोघांच्या संपर्कात असणार्या १७ जणांचाीही चौकशी करण्यात येणार आहे. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा :
- सावधान… ‘स्वाइन फ्लू’ पाय पसरतोय! राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात; 13 जणांचा मृत्यू
- निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय : जम्मू-काश्मीरमध्ये परराज्यातील नागरिकांसह सुरक्षा दलाच्या जवानांनाही मतदानाचा हक्क
- Adani Gets ‘Z’ Security : उद्योगपती गौतम अदानी यांना ‘झेड’ सुरक्षा, जाणून घ्या महिन्याचा खर्च…