UPSC : 'युपीएससी'च्या अध्यक्ष निवडीवरून राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : मनोज सोनी यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC’) अध्यक्ष बनवल्याबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी एक ट्विट करत एक- एक करून घटनात्मक संस्था नष्ट केल्याचा आरोपही सरकारवर केला आहे.
सोनी यांच्या नियुक्तीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना गांधींनी ‘युपीएससी’ (UPSC’) आता ‘केंद्रीय संघ प्रचारक आयोग’ बनले आहे, अशी टीका करून सरकार संस्था नष्ट करत असल्याचे म्हटले आहे. ट्विटरवर एका वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध झालेल्या बातमीचा स्क्रीन शॉट शेअर करत त्यांनी सरकारची खिल्ली उडवली आहे.
राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारकडून एकामागून एक संस्था संपवून राज्यघटना उद्ध्वस्त केली जात आहे. देशातील शैक्षणिक आणि घटनात्मक संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या लोकांची नियुक्ती केली जात आहे. सोनी हे भाजप-आरएसएसच्या जवळचे आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
Union Pracharak Sangh Commission.
India’s Constitution is being demolished, one Institution at a time. pic.twitter.com/8HEMnmVyTo
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 18, 2022
हेही वाचलंत का ?