देशात दिवसभरात १ हजार २५९ कोरोना रुग्णांची भर | पुढारी

देशात दिवसभरात १ हजार २५९ कोरोना रुग्णांची भर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात सोमवारी दिवसभरात १ हजार २५९ कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, ३५ रुग्णांचा कोरोनाने (corona) बळी घेतला. दरम्यान १ हजार ७०५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५ टक्के, तर दैनंदिन कोरोना संसर्गदर ०.२२ टक्के नोंदवण्यात आला.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ कोटी ३० लाख २१ हजार ९८२ पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी २४ लाख ८५ हजार ५३४ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, १५ हजार ३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २१ हजार ७० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८३ कोटी ५३ लाख ९० हजार ४९९ डोस लावण्यात आले आहेत. यातील १.३६ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील मुलांना लावण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८४ कोटी ६८ लाख ९८ हजार ४५५ डोस पैकी १६ कोटी ५ लाख ५१ हजार १३६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ७८ कोटी ७९ लाख ३२ हजार ९१३ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ५ लाख ७७ हजार ५५९ तपासण्या सोमवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

(corona) महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना मृत्यू

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ७८० रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये ६७ हजार ८२२, कर्नाटक ४० हजार ५१, तामिळनाडू ३८ हजार २५, दिल्ली २६ हजार १५१, उत्तर प्रदेश २३ हजार ४९४ तसेच पश्चिम बंगालमध्ये २१ हजार १९७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button