नाशिक : नाफेडमार्फत उन्हाळ कांद्याची खरेदी; केंद्रीय मंत्री गोयल सकारात्मक असल्याची डॉ. पवार यांची माहिती

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री डॉ. पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करताना राज्यमंत्री डॉ. भारती पवार.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री डॉ. पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करताना राज्यमंत्री डॉ. भारती पवार.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाफेडमार्फत राज्यात लवकरच उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कांदा खरेदीबाबत ना. गोयल यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पवार यांनी सांगितले.

ना. पवार यांनी याबाबत माहिती देताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. सद्यस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किमती विचारात घेत नाफेडमार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तत्काळ राबवावी, यासंदर्भात ना. गोयल यांचे लक्ष वेधल्याचे त्या म्हणाल्या. ग्राहक व्यवहार विभाग, केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय यांच्या निर्देशानुसार, कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते. कांद्याची खरेदी एफपीसी/एफपीओमार्फत शेतकरी/शेतकरी गट/शेतकरी उत्पादक संस्थांकडून फार्म गेटवर तसेच सहकारी संस्थांमार्फत लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीत प्रचलित बाजारदरांनुसार खुल्या लिलावाद्वारे केली जाते. किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत 2022 मध्ये 351 कोटी रकमेचा 2 लाख 38 हजार 196 मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता. यात सरासरी रुपये 1 हजार 475 प्रतिक्विंटल भाव कांद्याला मिळाला होता. यंदा कांदा उत्पादन मोठे झाल्याने नाफेडद्वारे किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांदा खरेदी होईल, असे गोयल यांनी सांगितल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

कांद्याचे उत्पादन अधिक
कांदा उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. देशभरातील साधारण 30.03 टक्के वाटा असलेल्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्रातील एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक कांदा उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. चालू हंगामात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. परंतु अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केल्याची माहिती डॉ. पवार यांच्याकडून देण्यात आली.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news