Heavy rainfall Chandrapur: जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार; वर्धा नदीला पूर, भोयेगाव–चंद्रपूर मार्ग बंद

भोयेगावचा पूल पुराच्या पाण्याखाली; जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Heavy rainfall Chandrapur: जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार; वर्धा नदीला पूर, भोयेगाव–चंद्रपूर मार्ग बंद
Published on
Updated on

चंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आला असून अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुराच्या पाण्याखाली भोयेगाव येथील पूल गेल्याने भोयेगाव–चंद्रपूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून हवामान विभागाने आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Heavy rainfall Chandrapur: जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार; वर्धा नदीला पूर, भोयेगाव–चंद्रपूर मार्ग बंद
Chandrapur Student Death | गाय चारण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा वीज कोसळून मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक लहान-मोठे नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहत असल्याने ग्रामीण भागातील काही मार्गांवर वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Heavy rainfall Chandrapur: जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार; वर्धा नदीला पूर, भोयेगाव–चंद्रपूर मार्ग बंद
Chandrapur Tigress Captured | अखेर नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

विशेषतः भोयेगाव येथील पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने भोयेगाव–चंद्रपूर हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पूर ओसरेपर्यंत हा मार्ग बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Heavy rainfall Chandrapur: जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार; वर्धा नदीला पूर, भोयेगाव–चंद्रपूर मार्ग बंद
Chandrapur Liquor Seized | भद्रावती पोलिसांची धडक कारवाई; विदेशी दारूसाठा, कारसह ८.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पूरस्थितीमुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. आवश्यकतेनुसार मदत व बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, हवामान विभागाने आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील काही तासांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पूरग्रस्त भाग, नदी-नाले आणि पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून जाण्याचा प्रयत्न करू नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news