लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला.

मनोज जरांगे-छगन भुजबळ यांनी एकत्र येत लढा उभारावा: बच्चू कडू 

Published on
अमरावती, पुढारी वृत्तसेवा: राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पेटलेला आहे. दरम्यान आता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे. बुधवारी (दि.१९) ते अमरावतीत माध्यमांशी बोलत होते. आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे. लवकरच जरांगे आणि भुजबळ दोघांचीही आपण भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

जरांगे आणि भुजबळ यांनी एकत्र का आले पाहिजे ?

  • मराठा – ओबीसी वाद आता शांत झाला पाहिजे
  • मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे.
  • सगळे मराठे ओबीसीमध्ये आले, तर अडचण होईल.

मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे.

मराठा – ओबीसी हा वाद आता शांत झाला पाहिजे. महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे. मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे. त्यामुळे जरांगे यांची मागणी रास्त आहे. सगळे मराठे ओबीसी मध्ये आले, तर सध्या असलेल्या ओबीसीमध्ये अडचण निर्माण होईल, हा जो संशय आहे, तो देखील काही प्रमाणात वास्तविक आहे. मात्र, जरांगे आणि छगन भुजबळ यांनी एकत्र येऊन दिल्ली समोर लढा उभारला पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.
ओबीसी मधील आरक्षणाचा कोटा कसा वाढविता येईल यासाठी लक्ष दिले पाहिजे. याकरिता मी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांना उद्या किंवा परवा भेटणार आहे, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे देखील आमदार कडू यांनी सांगितले.
हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news