वर्धा : मांडवा येथे तीन जणांनी पाण्यात बुडून गमावला जीव | पुढारी

वर्धा : मांडवा येथे तीन जणांनी पाण्यात बुडून गमावला जीव

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथे गणपती विसर्जनाला गेलेल्या युवकासह दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (९ सप्टें) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  मांडवा येथे गावाशेजारी असलेल्या मोती नाल्याच्या बंधारा परिसरात पाच ते सहा जण गणपती विसर्जन करायला गेले होते. गणपती मूर्तीच विसर्जन करत असताना संदीप चव्हाण (वय ३५) या युवकासह कार्तिक बालवीर (१२) आणि अथर्व वंजारी (१४) हे दोन लहान मुल पाण्यात बुडू लागले.

तीन जण पाण्यात बुडत असल्याचे पाहून यावेळी सोबत असलेल्या मुलानी आरडाओरडा करत गावाकडे धाव घेतली. घटना महिती होताच नागरिकांनी मोती नाल्याकडे धाव घेत तिघांना बाहेर काढले. दरम्यान दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एका जणाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला, अशी माहिती सावंगी पोलिसांनी दिली. तिघांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी भेट दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button