यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस सोमवारी दुपारपर्यंत धो-धो सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अधरपूस प्रकल्पाचे दोन दरवाजे २५ मीटरने उघडण्यात आले आहे. पुढील काही तास पाऊस असाच राहिला तर आणखी दोन दरवाजे पूस प्रकल्पाचे उघडले जाणार आहे. बेंबळा प्रकल्पाचे १८ ही दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, कळंब तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे.