

पाण्याची पातळी वाढतच असल्याने नागरिकांना सूरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. पूराचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांना संसारोपयोगी साहित्य वाचविण्याची चिंता वाढली आहे. या वार्डांसोबतच पूराने शहरातील उप जिल्हा रूग्णालयातही धडक दिली आहे. थेट रूग्णालयातच पाणी शिरल्याने आरोग्य यंत्रणा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चिमूर शहरातील किल्ला परिसरातील सभागृहात पूरामुळे बाधित होणा-या नागरिकांना आश्रय दिला जात आहे.