अमरावती : वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू | पुढारी

अमरावती : वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : अमरावती तालुक्यातील जामडोल येथे शेतात काम करत असताना वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर चार शेतकरी बचावले. किशोर भगवान पाटील (वय ४२) व अविनाश श्यामराव निबोंरकर (वय ३२) दोघेही रा. करजगाव, ता. अमरावती असे मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. या घटनेची नोंद माहूली जहागीर पोलीस ठाण्यात झाली आहे.

किशोर पाटील हे जामडोल येथे अनेक वर्षांपासून शेती मक्ताने वाहीत होते. नेहमी प्रमाणे औषध फवारणी करण्यासाठी शेतमजूरांना घेऊन ते शेतात गेले होते. अचानक मेघ गर्जनेसह पाऊस आल्याने झाडाच्या आडोशाला सर्वजण थांबले असता त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये किशोर आणि अविनाश यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुदैवाने चार जण बचावले. या घटनेची माहिती मिळताच माहूली जहागीर पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

हेही वाचलंत का?

Back to top button