नागपुर : धर्मसंसदेत केलेली विधाने हिंदुत्वाचे शब्द नाहीत : मोहन भागवत
नागपुर, पुढारी ऑनलाईन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) रविवारी ‘धर्म संसद’ बाबत एका कार्यमक्रमात बोलताना म्हणाले, हिंदुत्वाचे पालन करणारे लोक आमच्या मतांशी सहमत हाेत नाहीत.
एका आयोजित व्याख्यानमालेत ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर ते बोलत होते. धर्म संसदेत केलेली विधाने हे हिंदुत्वाचे नाहीत, तसेच रागात काही बोलून गेलो तर ते हिंदुत्व नाही. असे मोहन भागवत म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, मोहन भागवत म्हणाले, वीर सावरकर यांनी म्हटले होते की, हिंदु समाज एकजुट आणि संघटित झाला तर भगवत गीतेबाबत बोलले जाईल परंतु कोणाचे नुकसान करण्याबदृल नाही, असे भागवत म्हणाले.
देशात हिंदु राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे , त्याबाबत ते म्हणाले हिंदु राष्ट्र मानत असाल किंवा नसाल परंतु हे हिंदु राष्ट्रच आहे. तसेच, संघातील लोकांचे विभाजन केले नसते परंतु काही मतभेद दूर करायचे होते. तसेच आम्ही हिंदुत्वाचे पालन करतो.
हे ही वाचलं का