कल्याण : उधार दिलेले १ लाख रुपये मागण्यास गेलेल्या महिलेचा खून

कल्याण : उधार दिलेले १ लाख रुपये मागण्यास गेलेल्या महिलेचा खून

कल्याण : पुढारी वृत्तसेवा : मित्राला उधार दिलेले १ लाख रुपये मागण्यासाठी घरी गेलेल्या महिलेची मित्राच्या भावाने धारदार चाकूने वार करत हत्या केली. ही घटना कल्याण पूर्व, चक्की नाका, शास्त्रीनगर टेकडी जवळ आज (दि.१०) घडली. रंजना राजेश जयस्वाल (वय ४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रंजना राजेश जयस्वाल (वय ४५) पार्लर व्यवसाय करत होती. व्यवसाय करताना मित्र अजय आनंद राजभर याला पैशांची गरज असल्याने तिने त्याला १ लाख रुपये उधारीवर दिले होते. मात्र मागील काही दिवस अजय राजभर हा उधारीचे पैसे परत देत नव्‍हता. तिने त्याच्या घरी जाऊन विचारणा केली. यावेळी अजय घरी नव्हती.  त्याचा भाऊ विजय राजभर आणि त्याची आई लालसा देवी राजभर यांच्याबरोबर रंजना यांचे भांडण झाले.

यावेळी विजय राजभर यांनी रंजना जयस्वाल यांच्या अंगावर चाकूचे वार केले. यातच रंजना जैस्वाल यांचा मृत्यू झाला. दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर काही तासातच कोळशेवाडी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे.तपास कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news