ठाणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात भात, वरी पिकांबरोबरच सोनचाफा, हळद, भेंडी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन करावे. शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न वाढावे, यासाठी आराखडा तयार करावा. तसेच खरीप हंगामात खते, बियाणे, पीककर्ज पुरवठा सुरळीत होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज (दि. ९) येथे दिले.