

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या १७ पैकी १२ नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष आणि सभापतींचा देखील समावेश आहे. यामुळे कळंब तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून उबाठा गटातील तीन नगरसेवकांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केल्याने कळंब नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नगरसेवकांच पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून जिल्हयात शिवसेना वाढवण्याचं काम सुरु आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक शिवसेनेत सामील होण्यासाठी येत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नगरसेवक शिवसेनेत आले असून काल उबाठा गटाचे ३ नगरसेवक शिवसेनेत दाखल झालेत. त्यामुळे १७ पैकी १५ नगरसेवक आपल्याकडे आले आहेत. उबाठा गटाकडे आता काय उरलंय? जे होते ते झेंडेही आता इकडे आलेत."
आज झालेल्या या पक्षप्रवेशात माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, माजी नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, माजी नगराध्यक्ष आशा भवर, माजी उपनगराध्यक्ष सुभाष पवार, माजी उपनगराध्यक्षा इंदुमती हौसलमल, साधना बागरेचा, गीता पुरी, माजी उपनगराध्यक्ष सफुरा शकील काझी, माजी गटनेता लक्ष्मण कापसे, माजी नगरसेवक मुख्तार बागवान, निलेश होनराव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी प्रवेश केला.
हेही वाचा :