अच्छे दिन लोकांना पहायला मिळालेच नाहीत : शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा
ठाणे : पुढारी ऑनलाईन डेस्क : अच्छे दिन लोकांना पहायला मिळालेच नाहीत : शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा भाजपने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी ते म्हणाले, ठाणे जिल्ह्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. काही जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. भाजपकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय. काही जिल्ह्यांचा दौरा करणार करणार आहे. दौऱ्याची सुरुवात ठाणे जिल्ह्यापासून करणार आहे.
अच्छे दिन लोकांना पहायला मिळालेच नाहीत. २०१८ मध्ये ग्रामपंचायतींना दिलेली आश्वासने अपूर्णच आहे. ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्शन आश्वासन अपूर्णच आहे. ३० टक्के घरात शौचालये नाहीत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :