'अंधेर नगरी चौपट राजा'; केडीएमसीवर मनसे आमदार राजू पाटील यांची टीका
डोंबिवली पुढारी वृत्तसेवा : केडीएमसीच्या ग्रामीण भागातील पथदिव्यांचे दीड कोटीचे वीज बिल केडीएमसीने भरले नाही. त्यामुळे वीज महावितरणाने त्यांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. मात्र ही थकबाकी ग्रामपंचायतीची असून ज्यावेळी २७ गावे केडीएमसीमध्ये समाविष्ट झाली. त्यांनतर बिल नियमित भरण्यात येत असल्याची माहिती केडीएमसीकडून देण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रशासन आणि केडीएमसीला लक्ष्य केले.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 27 गावांचा भाग समाविष्ट आहे. मात्र या 27 गावांतील काही भागात पथदिव्यांचा वीजपुरवठा केडीएमसीने दीड कोटींची थकबाकी न भरल्याने महावितरणकडून खंडीत केल्याची माहिती आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिली.
तसेच हा भाग अंधारामध्ये गेल्याबद्दल केडीएमसी आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांबद्दल संताप व्यक्त करत महावितरणचे बिल भरणे ही तुमची जबाबदारी नाही का? असा सवाल करत लवकरात लवकर हे देयक अदा करण्याची मागणी केली आहे.
‘अंधेर नगरी चौपट राजा’
या सर्व प्रकाराबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनीही तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. आमदार पाटील यांनी ‘अंधेर नगरी चौपट राजा’ या शिर्षकाखाली ट्विट करत निशाणा साधला आहे. उद्घाटनाचे कार्यक्रम, श्रेय लाटणे आणि बॅनर लावा असा जप करण्याऐवजी कल्याण डोंबिवलीतील प्राथमिक सुविधांकडे लक्ष दिलेत तर बरं होईल आशा शब्दांत त्यांनी केडीएमसी प्रशासन आणि शिवसेनेला लक्ष केले आहे.
किशोरवयीन मुलांसाठी नोव्हावॅक्सच्या कोरोना लसीला परवानगी https://t.co/TJN4oA3nA7 #Pudharionline #Pudharinews #Novavax #Corona #Vaccine
— Pudhari (@pudharionline) March 24, 2022
दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत केडीएमसी विद्युत विभागाकडे विचारणा केली असता संबंधित भागातील महावितरणच्या थकबाकीची रक्कम ही ग्रामपंचायत काळातील असल्याचे पुढारीशी बोलताना सांगण्यात आले. तसेच ही रक्कम वगळता संबंधित गावे केडीएमसीमध्ये समाविष्ट झाल्यापासून महावितरणची सर्व देयके नियमित भरली जात आहेत. ही बाब महावितरणच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर त्यांनी लगेचच संबंधित भागातील स्ट्रीटलाईटचा वीज पुरवठा पूर्ववत केल्याची माहितीही विद्युत विभागाचे अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
हेही वाचा