Sharad Pawar Analysis: बिहारचा निकाल एकतर्फी का लागला? शरद पवारांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

Bihar Election 2025: शरद पवारांनी बिहार निवडणुकीतील NDAच्या प्रचंड विजयानंतर महिलांच्या मोठ्या प्रमाणातील मतदानाला निर्णायक मानले आहे. त्यांच्या मते महिलांच्या खात्यातील 10 हजार रुपयांच्या सरकारी योजनेचा मतदानावर मोठा प्रभाव पडला.
Sharad Pawar
Sharad PawarPudhari
Published on
Updated on

Sharad Pawar Explains Women Voters’ Role in NDA’s Landslide Victory:

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने 202 जागांवर विजय मिळवत निर्णायक बहुमत मिळवले, तर विरोधकांच्या महाआघाडीला फक्त 35 जागांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महिलांच्या मोठ्या प्रमाणातील मतदानाचा NDAला फायदा

बिहारमध्ये एनडीएला एवढ्या मोठ्या फरकाने बहुमत कसे मिळाले, यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मतदानानंतर त्यांनी स्थानिक काही लोकांशी चर्चा केली. या चर्चेतून त्यांना कळले की महिलांनी मतदानात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि याचा परिणाम एनडीएच्या जागांवर झाला.

Sharad Pawar
Bihar Election Results: आश्चर्यकारक! तेजस्वी यादवांच्या RJD ला भाजप अन् जदयूपेक्षा जास्त मतं

पवारांनी दावा केला की, महिलांना खात्यात 10 हजार रुपये जमा करण्याच्या सरकारी योजनेमुळे, त्यांच्यात सरकारबद्दल सकारात्मकता निर्माण झाली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. याचा थेट फायदा एनडीएला झाल्याचे त्यांनी सांगितले.

“सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या आधी पैसे वाटणे धोक्याचे”

पुढे शरद पवारांनी महाराष्ट्रातील ‘लाडकी बहिण योजना’चा संदर्भ देत गंभीर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, “निवडणुकीच्या आधी सरकारी योजनांच्या माध्यमातून थेट नागरिकांच्या खात्यात पैसा टाकणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. हे थेट मतांवर परिणाम करणारे धोरण ठरत असेल, तर लोकशाहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.”

Sharad Pawar
Political Speculation Bihar | ‘नितीश’ लवकरच शिंदे होणार का? बिहारच्या निकालानंतर राजकारणात चर्चांना उधाण...

त्यांनी निवडणूक आयोगालाही सांगितलं की, “अशा प्रकारे निवडणुकीच्या आधी निधीचे वितरण करणे योग्य आहे का, याचा गंभीर विचार आयोगाने करायला हवा. निवडणूक स्वच्छ, पारदर्शक आणि निष्पक्ष होणे गरजेचे आहे.”

महाआघाडीचा पराभव का झाला?

पवारांच्या मते, महाआघाडीला अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, यामागे दोन कारणे दिसून येतात

  1. महिलांचा मोठ्या प्रमाणातील मतदानाचा कल सत्ताधाऱ्यांकडे झुकलेला होता.

  2. विरोधकांकडे स्पष्ट मेसेज आणि प्रभावी प्रचाराची कमतरता होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news