मुंबईतील पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम महापालिका निवडणुकीसाठीच : अजित पवार
तासगाव, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुंबईत झालेला कार्यक्रम हा मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी होता, अशी टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली. सांगली जिल्ह्यातील अंजनी येथील स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतल्यानंतर अजित पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि मंत्री शंभूराजे देसाई यांच्या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले, मी उपमुख्यमंत्री असताना अनेक नेते येऊन भेटायचे. मी पण अनेक मंत्र्यांना जाऊन भेटलो. अशा वेळी विकास कामाविषयी चर्चा होत असते. आमचे पक्ष आणि विचारधारा जरी वेगळी असली तरी आम्ही राजकीय मंडळी एकमेकाचे दुश्मन नाही. बाळासाहेब ठाकरे व शरद पवार ऐकमेका बद्दल टीकात्मक भाषण करायचे. पण एकत्र भेटल्यावर मैत्रीपूर्ण बोलायचे आणि हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपली ती संस्कृती आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
जातीनिहाय जनगणनेविरोधातील याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार https://t.co/9ywJ3kblPP #SupremeCourtofIndia #SupremeCourt #caste #census2023 #pudharionline
— Pudhari (@pudharionline) January 20, 2023