सांगली : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

सांगली : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

जत (सांगली), पुढारी वृत्तसेवा : जालिहाळ बुद्रुक (ता. जत) येथे पतीने पत्नीचा खून केला. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात बेडग्याने वार करून तिला संपविले. केसराबाई बाळकृष्ण सावंत (वय ४३) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि.24) सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, जालिहाळ बुद्रुक येथे बाळकृष्ण संदिपान सावंत यांचा विवाह पंचवीस वर्षांपूर्वी कर्नाटक येथील वळसंगी (ता. विजयपूर) येथील केसराबाई हिच्याशी झाला होता. संदिपान व केसराबाई यांना तीन मुली आहेत. दरम्यान, गेल्या चार महिन्यापूर्वी केसराबाई व आरोपी बाळकृष्ण सावंत यांच्यात भांडणे होत होती. संशयित आरोपी बाळकृष्ण व पत्नी केसरबाई हिच्यावर चारित्र्यावरून संशय घेत होता. या कारणावरून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. याच कारणावरून चार महिन्यापूर्वी केसराबाई तिच्या माहेरी गेली होती. एक महिन्यापूर्वी बाळकृष्णने माहेरी जाऊन समजूत काढून केसराबाई हिला घेऊन आला होता. अधून मधून त्यांची सतत भांडणे होत होती. याबाबतची कल्पना तिने तिच्या भावाला दिली होती.

पती-पत्नीत राहत्या घरात मंगळवारी सकाळी कडाक्याचे भांडण झाले. यात पतीने शिव्या देत बेडग्याने केसराबाईच्या डोक्यात वार केला. वार वर्मी बसल्याने केसराबाईचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद कृष्णा हंबीर पवार (रा. वळसंगी, ता. विजयपुर) यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली. संशयित आरोपी पती बाळकृष्ण संदीपान सावंत यास उमदी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news