

पुणे: मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये रेल्वे विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. एकूण 946 मार्ग किलोमीटरपैकी आत्तापर्यंत 913 मार्ग किलोमीटरचे विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे. फक्त विगनवाडी ते बीड सेक्शन यादरम्यानचे 33 मार्ग किलोमीटर विद्युतीकरणाचे काम बाकी असून, ते प्रगतिपथावर आहे.
हे काम जुलै 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वे पुणे विभागाचे उद्दिष्ट आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पुणे विभागातील संपूर्ण रेल्वेमार्ग विद्युत गाड्या चालविण्यासाठी सज्ज होतील. एकूण 946 मार्ग किलोमीटर (आरकेएम) म्हणजे 1,917 ट्रॅक किलोमीटर (टीकेएम) असे रेल्वेकडून गणले जाते.
यापैकी आत्तापर्यंत 913 आरकेएम 1,882 टीकेएम मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित विगनवाडी-बीड सेक्शन यादरम्यानचे 33 आरकेएम म्हणजेच 35 टीकेएमचे काम प्रगतिपथावर असून, ते जुलै 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे रेल्वेच्या अधिकार्यांनी दैनिक ‘पुढारी‘च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. (Latest Pune News)
महत्त्वाचे मुद्दे
विद्युतीकरण पूर्ण : 913 आरकेएम/1882 टीकेएम रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले.
अंतिम टप्पा : उर्वरित विगनवाडी-बीड सेक्शनचे काम पूर्ण होणार.
वेळेचे उद्दिष्ट : उर्वरित काम जुलै 2025 पर्यंत पूर्ण होणार.
एकूण विद्युतीकरण : प्रकल्प पूर्ण झाल्यावर 946 आरकेएम/1917 टीकेएम मार्ग विद्युतचलित होणार.
प्रवाशांना होणारे फायदे
जलद आणि अधिक आरामदायक प्रवास : इलेक्ट्रिक गाड्यांची गती जास्त असते आणि त्या अधिक वेग पकडतात. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होतो तसेच त्या कमी कंपन आणि आवाजामुळे अधिक आरामदायक असतात.
प्रवासाच्या खर्चात बचत : विद्युतीकरणामुळे रेल्वेइंधनाचा खर्च कमी होतो, ज्याचा फायदा अप्रत्यक्षपणे प्रवाशांना तिकिटाच्या दरात घट होऊन मिळू शकतो.
गाड्यांची उपलब्धता आणि वारंवारिता वाढ : इलेक्ट्रिक गाड्या अधिक कार्यक्षम असल्याने त्यांची उपलब्धता वाढते आणि मार्गावर गाड्यांची वारंवारिता वाढविता येते, यामुळे प्रवाशांना सोईस्कर वेळापत्रक मिळते.
उत्तम कनेक्टिव्हिटी : विद्युतीकरणामुळे दुर्गम भागांमध्येही रेल्वेसेवा पोहचविणे शक्य होते, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारते.
पर्यावरणाला होणारे फायदे
कार्बन उत्सर्जन घट : इलेक्ट्रिक गाड्या थेट कार्बन उत्सर्जन करीत नाहीत. त्यामुळे त्या प्रदूषण नियंत्रणासाठी उत्तम असतात. परिणामी, वातावरणातील कार्बन उत्सर्जन आणखी कमी होते.
हवाप्रदूषणात घट : डिझेल इंजिनामुळे होणारे नायट्रोजन ऑक्साइड आणि पार्टिक्युलेट मॅटर (धूलिकण) यांचे उत्सर्जन इलेक्ट्रिक गाड्यांमुळे पूर्णपणे थांबते, ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते.
ध्वनिप्रदूषणात घट : इलेक्ट्रिक गाड्या डिझेल गाड्यांच्या तुलनेत खूप कमी आवाज करतात, ज्यामुळे रेल्वेमार्गांजवळ राहणार्या लोकांचे ध्वनिप्रदूषण कमी होते.
ज्वलनशील इंधनावरील अवलंबित्व कमी : विद्युतीकरणामुळे रेल्वेचे डिझेलसारख्या ज्वलनशील इंधनावरील अवलंबित्व कमी होते, यामुळे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण होते आणि आयात खर्चात बचत होते.
ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ : इलेक्ट्रिक गाड्या ऊर्जा रूपांतरणात अधिक कार्यक्षम असतात, ज्यामुळे कमी ऊर्जेत जास्त काम होते. तसेच, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणालीमुळे ब्रेक लावताना निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा वापरली जाऊ शकते.
रेल्वेच्या उत्पन्नात बचत
इंजिनच्या तुलनेत कमी असतो, ज्यामुळे रेल्वेच्या परिचालन खर्चात बचत होते.
इलेक्ट्रिक गाड्यांची ऊर्जा कार्यक्षमता जास्त असते, ज्यामुळे प्रतिकिलोमीटर इंधनाचा खर्च कमी होतो.
इलेक्ट्रिक इंजिन अधिक शक्तिशाली असतात, त्यामुळे ते जास्त वजनाची मालगाडी आणि जास्त डब्यांच्या पॅसेंजर गाड्या ओढू शकतात. यामुळे एकाच वेळी जास्त माल आणि प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होते, परिणामी रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होते.
गाड्यांच्या वेळेत सुधारणा आणि वारंवारिता वाढल्यामुळे जास्त प्रवासी रेल्वेकडे आकर्षित होतात, ज्यामुळे प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न वाढते.
नवीन मार्गांवर आणि दुर्गम भागांमध्ये सेवा विस्तार
पर्यावरणपूरक वाहतुकीमुळे मागणीत वाढ
पुणे विभागातील रेल्वे विद्युतीकरणाचे काम अत्यंत वेगाने आणि उत्तम कार्यक्षमतेने सुरू आहे. बहुतांश मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित विगनवाडी ते बीड सेक्शनचे कामही अंतिम टप्प्यात आहे. यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळेल तसेच पर्यावरणाचीही काळजी घेतली जाईल.
हेमंतकुमार बेहरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग