

पुणे: महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळून 100 दिवस पूर्ण होताच काँग््रेासने सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. हा कार्यकाळ पुणेकरांची फसवणूक करणारा आणि भष्टाचाराने ग््राासलेला असल्याचा आरोप शहर काँग््रेासचे अध्यक्ष अरविंद शिंदे आणि गटनेते ॲड. रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम यांनी केला.
प्रशासकीय यंत्रणा आणि सत्ताधारी भाजप यांच्यात ‘अर्थ’पूर्ण साटलोटे असल्याचा आरोप करत पुढील काळात तीव आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. भाजपने जाहीरनाम्यात दिलेली 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी आणि महिलांच्या नावावरील मिळकतींना सवलत ही आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याचे काँग््रेासने नमूद केले.
महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते यांच्यातील अंतर्गत वादामुळे विकासकामे ठप्प झाल्याचा आरोपही करण्यात आला.शहरात वाढती वाहतूक कोंडी आणि विस्कळीत पाणीपुरवठा ही परिस्थिती गंभीर असल्याचे काँग््रेासने म्हटले आहे.
पीएमपीएमएलमधील भरती व पदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता, होर्डिंग निविदेतील वाद आणि कचरा प्रकल्पांतील कथित भष्टाचार यावर काँग््रेासने आवाज उठवला आहे. तसेच बिल्डरांना सवलती देण्याचे धोरण आणि नालेसफाईतील अनियमितता यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
दरम्यान, शहरी गरीब आरोग्य योजनेतील उत्पन्नमर्यादा वाढवण्या बाबत काँग््रेासच्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा करण्यात आला. नदीकाठ विकास प्रकल्पालाही काँग््रेासने विरोध दर्शवला असून, पुणेकरांच्या हितासाठी आक्रमक भूमिका कायम ठेवणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले.