Ghod Dam Dimbhe Manikdoh Tunnel: डिंभे-माणिकडोह बोगद्यावरून घोड धरणाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; शिरूर-श्रीगोंदा नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

घोड धरणाच्या लाभक्षेत्रावर परिणाम होण्याची भीती; हक्काच्या पाण्यासाठी स्थानिक नेतृत्वाने आवाज उठवण्याची मागणी
Ghod Dam
Ghod DamPudhari
Published on
Updated on

निमोणे: शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणाचे पाणलोट क्षेत्र असणाऱ्या परिसरात घोड धरणाच्या निर्मितीनंतर एकूण सहा धरणे झाली. यामध्ये तब्बल ३० टीएमसी पाणी अडवले गेले. त्यातच आता डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतृत्व एकत्र येत मोठा दबाव निर्माण करीत आहे.

Ghod Dam
Pune Rail Madad Medical Assistance: ‘रेल मदत’ ठरतेय प्रवाशांसाठी देवदूत; ३,८८२ प्रवाशांना वेळेवर वैद्यकीय उपचार

उत्तर पुणे जिल्ह्याच्या कडव्या विरोधानंतर प्रास्ताविक बोगद्याला तात्पुरती स्थगिती मिळाली; मात्र हा बोगदा झाल्यानंतर ज्या घोड धरणाच्या लाभ क्षेत्रावर अतिशय विपरीत परिणाम होणार आहे, त्या परिसरातून ब्र शब्दही काढला जात नाही, हेच मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे हक्काच्या पाण्यावर घाला घातला जात असताना शिरूर व श्रीगोंद्याचे नेतृत्व गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Ghod Dam
Supe Ghat ST Bus Accident: सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली; चार विद्यार्थी जखमी

घोड धरणामुळे शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओलिताखाली येते. या धरणाचा शिरूरपेक्षा श्रीगोंदाकरांना मोठा फायदा आहे; मात्र श्रीगोंदा तालुक्याची भौगोलिक रचना पाहता तब्बल ६० टक्के भाग हा दुष्काळी भागात मोडतो. कुकडी कालवा हा बहुतांशी घोडच्या लाभक्षेत्राजवळून जातो आणि त्यामुळे राजकीय अपरिहार्यता म्हणून श्रीगोंदा तालुक्यातील नेतृत्व आपल्याच भागाला पाणी मिळणार, यासाठी बोगद्याला विरोध करीत नाही, उलट बोगदा झाला पाहिजे, यासाठी आग्रही राहते. परंतु, शिरूरकरांना या बोगद्याचा काय फायदा होणार आहे?

Ghod Dam
Pune Ganeshotsav Dekhava: कसबा पेठेत ‘देखावा फिव्हर’; पर्यावरणपूरक सजावटीपासून ऐतिहासिक प्रतिकृतींपर्यंत बाप्पाचे आकर्षण

घोड धरणाच्या निर्मितीच्या काळात साडेदहा टीएमसी पाणी या धरणासाठी आरक्षित केले होते; मात्र प्रत्यक्षात धरणाची निर्मिती झाल्यानंतर केवळ साडेसात टीएमसी पाणी अडवले गेले. मागील अनेक वर्षांपासून धरणात गाळ साचल्यानंतर धरणाची उपयुक्त साठवण क्षमता पाच टीएमसी झाली. पाण्याची साठवण क्षमता कमी कमी होत असताना याच धरणावरून साकळाई उपसा जलसिंचन योजना युद्धपातळीवर सुरू आहे. साकळाई योजनेचे लाभक्षेत्र श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील ३२ गावे आहेत. जसं जमेल तसं कुकडी प्रकल्पातील पाणी अहिल्यानगर जिल्ह्यात पळवलं जात आहे.

Ghod Dam
Pune PM Awas Yojana: पुणेकरांचे हक्काचे घराचे स्वप्न साकारणार; सहा भागांत ५ हजार ५३ घरे उभारणार

उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी त्या भागातील नेतृत्व अहिल्यानगरच्या नेतृत्वाशी दोन हात करताना पाहायला मिळते; मात्र डिंभे-माणिकडोह बोगदा झाला, तर घोडला पाणी कसं येणार, याबाबत शिरूरचं कोणतंही नेतृत्व प्रश्न विचारायला तयार नाही. हा बोगदा झाला तर शिरूर तालुक्यातील औद्योगीकरण, पिण्याच्या पाण्याच्या योजना, उजव्या कालव्याखाली असलेली शेती, बॅक वॉटरवरून होणारे सिंचन हे सर्व कोलमडून पडेल. हे वास्तव असतानाही हक्काच्या पाण्यासाठी कोणीच आवाज उठवत नसल्याचे दुर्दैवी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news