शिरगाव(पुणे) : तब्बल तीन आठवडे पावसाने हुलकावणी दिल्यामुळे मावळातील पेरण्या खोळंबल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून पावसास सुरुवात झाल्याने शेतकरीवर्ग आनंदला आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. पावसाचे आगमन झाल्यामुळे भातशेतीच्या कामांना वेग आला आहे. मावळातील काही परिसरात मूग, घेवड्याची पेरणी सुरू आहे.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भाताची लागवड केली जाते. पावसाळ्यात भाताची सर्वाधिक लागवड होते. सध्या पेरणीयोग्य पाऊस सुरू असल्याने शेतकर्यांनी पारंपरिक पद्धतीने मशागत करून पेरणी सुरू केली आहे. या भागात अजूनही बैल आणि नांगर यांच्या मदतीने पारंपरिक पद्धतीनेच शेतीची मशागत केली जाते.
हेही वाचा