डोळे येणे हा संसर्ग प्रामुख्याने पावसाळ्यात होतो. डोळे येणे हा सौम्य प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग असला, तरीदेखील याबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. संसर्ग झालेला रुग्ण पाच ते सहा दिवसांमध्ये पूर्णपणे बरा होतो. मात्र, या संसर्गाचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.– डॉ. रामचंद्र हंकारे,जिल्हा आरोग्य अधिकारी.