पुणे : भेगा आणि खड्डे पडलेल्या शहरातील 8 उड्डाणपुलांचे आणि त्यांना जोडणार्या रस्त्यांचे नूतनीकरण करून ते खड्डेमुक्त करण्यात येणार आहेत. यामध्ये बी. टी. कवडे आणि मुंढवा रेल्वे उड्डाणपुलासह म्हात्रे पूल, संभाजी आणि शिवाजी या जुन्या पुलांचा समावेश आहे.
वाहतुकीच्या सोयीसाठी शहरात विविध ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत.
हे उड्डाणपूल बांधल्यानंतर पुढील तीन वर्षे त्याच्या डागडुजीची जबाबदारी संबंधित विकसक कंपनीवरच आहे. बहुतेक सर्व पुलांचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड संपला आहे. तर काही पूल हे साधारण शंभर वर्षे जुने असून, जुन्या पद्धतीच्या या पुलांवर पॅचवर्क करून डागडुजी केलेली आहे. तसेच या पुलांना जोडणार्या रस्त्यांवरदेखील खड्डे पडले आहेत.
म्हात्रे पुलावर मागील काही वर्षांत डांबराचे थर वाढत गेल्याने पुलाचा भारदेखील वाढला आहे. या ठिकाणी मास्टेक अस्फाल्ट करण्याचे नियोजन आहे. नवी पेठेतील एस.एम. जोशी पुलाला सेगमेंटजवळ भेगा आहेत. तसेच मुंढवा आणि बी. टी. कवडे रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे.
याचा परिणाम वाहनांची गती मंदावण्यावर झाला आहे. प्रशासनाने या जोड रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा तसेच पुलावर मास्टेक अस्फाल्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या प्रकल्प विभागाने निविदा प्रक्रिया राबविली असून, या कामासाठी 4 कोटी 20 लाख रुपये खर्चाचे पूर्वगणन पत्र तयार करण्यात आले आहे.
मुंढवा व बी. टी. कवडे रोड रेल्वे ओव्हर ब्रिज, शिवाजी पूल, म्हात्रे पूल, संभाजी पूल, एस.एम.जोशी पूल, दांडेकर पूल आणि स्पायसर कॉलेज येथील पूल
हेही वाचा