विद्यार्थ्यांची सुटका नाहीच; कोरोना कमी, तरी नियम पाळण्याचे ‘एआयसीटीई’चे आदेश

विद्यार्थ्यांची सुटका नाहीच; कोरोना कमी, तरी नियम पाळण्याचे ‘एआयसीटीई’चे आदेश
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनापूर्वीचे जीवन पुन्हा एकदा सुरळीत होत असताना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) महाविद्यालयांमध्ये सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझर बंधनकारक करा, अशा सूचना दिल्या आहेत. एआयसीटीईच्या या भूमिकेमुळे आता विद्यार्थ्यांना मोकळा श्वास घेऊ द्याल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र आणि देशातील इतरही राज्यांत सध्या कोरोनाचा उद्रेक झालेला नाही. बहुतांश राज्यांमध्ये मास्कची सक्तीही उठविण्यात आली आहे. पुढील काही दिवसांमध्ये कोरोनाची लाट येईल, अशीही शक्यता आरोग्य यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आलेली नाही.

असे असले तरीही एआयसीटीईने महाविद्यालयांना सर्व प्रकारची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी गर्दी करू नये, मास्क वापरणे बंधनकारक आहे, सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे; याशिवाय थर्मल स्कॅनिंग करणे, वारंवार हात धुणे, एकत्र घोळक्याने फिरू नये, अशाही सूचना एआयसीटीईकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनाकाळात नियमांचा भडिमार झाल्याने आता विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि कर्मचारीही नियमांपासून सुटका होण्याची वाट पाहत आहेत. परंतु, त्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

एआयसीटीईच्या सूचना

  • महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंग, मास्कची पडताळणी आवश्यक
  • सातत्याने हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे
  • सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सुरक्षित अंतराचा वापर करणे
  • कॉलेजमध्ये सातत्याने साफसफाई केली जावी
हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news