पुणे : राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्त (बाधित) झालेले नागरिक पुनर्वसन करण्यात आलेल्या गावठाणात स्थलांतरित होण्यास तयार होत नाहीत किंवा पुनर्वसन करण्यासाठी जमीन उपलब्ध होत नाही, अशा नागरिकांना आता रोख रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार वेगवेगळे पर्याय निवडण्यास मदत होईल.