एनसीटीईने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार शालेय शिक्षण विभागाने त्वरित कार्यवाही करावी. ज्या शिक्षकांकडे एनसीटीईने बंधनकारक केलेली किमान पात्रता नाही अशा शिक्षकांना त्यांच्या मूळ पदावर पदावनत करावे व सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीमधून या जागा भरण्यात याव्यात.– तुषार कुंभार, अभियोग्यताधारकशिक्षक पात्रता परीक्षा ही बालकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करणारे प्रमुख कवच आहे. प्रशासनाने धोरणकर्त्यांचा, शिक्षक पात्रता परीक्षा ही नवीन पात्रता शिक्षकांना अनिवार्य करण्यामागचा हेतू व उद्देश समजून घेऊन त्याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा योग्य त्या सर्वस्तरावर लागू करण्यासाठी तत्काळ पावले उचलणे बालकांच्या हितासाठीगरजेचे आहे.– सचिन भराटे, अभियोग्यताधारक