मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राजकीय व्यक्तिंना राज्यात ठिकठिकाणी गावबंदी करण्यात आलेली आहे. असे असताना माळेगाव कारखान्याने शनिवारी पवार यांच्या हस्ते गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राजकीय नेत्यांच्या हस्ते हा कार्यक्रम घेवू नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने कारखाना व्यवस्थापनाकडे केली आहे. राजकीय व्यक्तिंच्या हस्ते गळीत हंगाम सुरु करण्याचा घाट घातल्यास कारखान्यावर बहुसंख्य मराठा जमून तीव्र आंदोलन छेडतील, त्याची जबाबदारी कारखान्यावर राहिल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.