Amol Kolhe on Government
Amol Kolhe on Government

Amol Kolhe on Government | देशातील सरकार एक फूल, दोन डाउनफूल; खासदार अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील सरकार केवळ उद्योगपतींचे कर्ज माफ करते, पण येथील कष्टकरी जनतेचे दु:ख त्यांना दिसत नाही. सरकार मुद्यांचे बोलत नाही, त्यामुळे जनतेचे महत्त्वाचे प्रश्न भरकटत आहेत. पालकमंत्री हे मालकमंत्री झालेत, असा आरोप खासदार खासदार अमोल कोल्हे यांनी देशासह राज्यातील सरकारवर केला. दरम्यान, त्यांनी देशातील सरकार "एक फूल, दोन डाउनफूल" अशी मिश्किल टीका करत, सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखालील शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, ते माध्यमांशी बोलत होते. (Amol Kolhe on Government)

Amol Kolhe on Government : फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात

पुढे बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवत आहेत. दरम्यान गेले २२ दिवस देशात कांदा निर्यातीवर बंदी आहे. पण सरकारमधील एकही नेता यासाठी दिल्लीतील सरकारला डोळ्यात डोळे घालून प्रश्न करत नाही, निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी करत नाही, असे देखील अमोल कोल्हे म्हणाले. (Amol Kolhe on Government)

रामाचा मक्ता कोण घेतंय, हे जनता पाहतेय

रामाचे नाव मनात ही घेतले तरी चालेल, अन् आयोध्येतही जाऊन घेतले तरी चालेल. रामाचा मक्ता कोण घेतंय, हे देशातील जनता पाहतंय, असेही खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Amol Kolhe on Government)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news