शेतकर्‍यांनी पेरणीसाठी घाई करू नये; हवामानतज्ज्ञांचे आवाहन

शेतकर्‍यांनी पेरणीसाठी घाई करू नये; हवामानतज्ज्ञांचे आवाहन

Published on

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांनी पेरणीसाठी घाई करू नये. जमिनीत 7 इंच पावसाची ओल तयार झाल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्ला हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकर्‍यांना दिला. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर (ता. आंबेगाव) येथे झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख बोलत होते. डख म्हणाले, की राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असून, दुष्काळ पडणार नाही. सर्व शेतकर्‍यांच्या पेरण्या पूर्ण होतील.

गेल्या चार ते पाच वर्षांत पावसाने आपली दिशा बदलल्यामुळे व पृथ्वीचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे राज्यासह देशभरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. यापुढे महाराष्ट्रात 27/28 जूनपासून पावसास सुरुवात होईल, तर आता 2 जुलैपर्यंत दिवसाआड पाऊस होईल. त्यानंतर 6 जुलै ते 9 जुलैदरम्यान पाऊस होईल. 14 जुलै ते 17 जुलै या तारखांना राज्यातील 80 टक्के भागात पाऊस होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. दर वर्षी 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरदरम्यान राज्यात सर्वत्र पाऊस होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news