मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू | पुढारी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील जळत्या टँकरमधून अंगावर पडलेल्या पेटत्या इथेनॉलमुळे लोणावळा शहराजवळ अतिदुर्गम ठिकाणी असलेल्या राजमाची या आदिवासी खेड्यातील एकाच कुटुंबातील तीन जण होरपळून मृत झाले आहेत. यात सविता कैलास वरे (वय 34) आणि कुशल कैलास वरे (वय 8) या मायलेकरांसह सविता वरे यांचा भाचा रितेश महादू कोशिरे (वय 18) यांचा समावेश आहे.

हे तिघेही जण त्यांच्या दुचाकीवरून लोणावळ्यातून राजमाचीकडे निघाले असता मृत्यूने अचानक त्यांच्यावर घाला घातला. कुशल आणि रितेश यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, सविता या गंभीररित्या भाजलेल्या असल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची ही बातमी समजताच संपूर्ण राजमाची गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील प्रत्येक वर्गात आता ग्रंथालय

मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वरील अपघातात आणखी एकाचा मृत्यू

पिंपरी : पीएमआरडीएचा विकास आराखडा आणखी लांबणीवर

Back to top button