पुणे : रुग्णांनी परस्पर औषधे घेणे टाळावे; तज्ज्ञांचे मत

रुग्णांनी काय काळजी घ्यावी?
एकापेक्षा अधिक औषधांचे मिश्रण असलेल्या 14 प्रकारच्या गोळ्यांवर केंद्र शासनाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागामध्ये अन्न आणि औषध प्रशासनातर्फे (एफडीए) बंदी आलेल्या औषधांचा साठा रिटेलरने होलसेलरला आणि होलसेलरने औषध उत्पादक कंपनीला परत करण्याचे आदेश दिले आहेत. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफसीडी) अर्थात एकाहून अधिक औषधांचे मिश्रण असलेल्या गोळ्यांचा संबंधित आजारावर होणारा परिणाम आणि उपचारात्मक स्पष्टता नसल्याने भारतीय औषध नियामक मंडळाने ताप, सर्दी, डोकेदुखी यामध्ये वापरल्या जाणार्या 14 प्रकारच्या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. यावर केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
बंदी असलेल्या औषधांच्या उपलब्धतेबाबत नियमितपणे पाहणी केली जाणार आहे. बॅन औषधे आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. रिटेल, होलसेल औषध विक्रेत्यांना उत्पादक स्तरावर औषधे परत करण्यास सांगण्यात आले आहे. औषधांचा तात्पुरता तुटवडा निर्माण होऊ शकतो. मात्र, यावरही तोडगा काढला जाईल.
– श्याम प्रतापवार,
सहआयुक्त (औषधे), अन्न व
औषध प्रशासन, पुणे विभागएकाहून अधिक औषधांच्या किंवा गोळ्यांच्या मिश्रणावर सरकारने बंदी घातली आहे. मात्र, ही औषधे रुग्णांची तक्रार जाणून घेऊन कॉम्बिनेशन न करता वेगळी दिली जाऊ शकतात. कोणत्याही आजारामध्ये औषधांचे घातक मिश्रण दिले जाऊ नये, हाच सरकारचा यामागचा उद्देश आहे.– डॉ. अच्युत जोशी, जनरल फिजिशियनघातक औषधे बॅन करण्याचा निर्णय योग्यच आहे. रुग्णांना आजारापासून आराम मिळावा, यासाठी डॉक्टर पर्यायी औषध सुचवू शकतात. त्यामुळे काही औषधांवर बंदी आली असली तरी त्यामुळे रुग्णांचे नुकसान होणार नाही. घातक मिश्रणांऐवजी डॉक्टर उपयुक्त औषधोपचार सुचवू शकतात.– डॉ. रोहिदास बोरसे, एमडी मेडिसिन, ससून रुग्णालय