कचरा विलगीकरण केंद्राला आग; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

कचरा विलगीकरण केंद्राला आग; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
Published on
Updated on

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा: धायरी येथील पारी रोडवरील पलीकडच्या कचरा विलगीकरण केंद्रात गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र, नागरिक व अग्निशामक दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे आग लवकर आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. कचरा विलगीकरण केंद्रात सुमारे वीस ते पंचवीस टन कचरा साठला आहे. गेल्या आठ दिवसांपासून कचरा हलविण्यात आलेला नाही. त्यामुळे मोठे ढिगारे साठले आहे.

दुपारी अचानक आग लागून धुराचे मोठे लोट परिसरात पसरले. धुराबरोबर आगीचा भडका उडाला. त्यामुळे परिसरातील रहिवासी भयभीत झाले. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाडीसह जवान, सिंहगडरोड क्षेत्रीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news