पीक विमा कंपन्यांची श्वेतपत्रिका काढा : स्वाभिमानीच्या रविकांत तुपकर यांचे आंदोलन
पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शेतकऱ्यांना लुटणाऱ्या पीक विमा कंपन्यांची मागील पाच वर्षांची श्वेतपत्रिका काढावी आणि विमा कंपन्यांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे केली.
कृषी आयुक्तालयासमोर रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
स्वाभिमानीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश बालवडकर यांच्यासह शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
- Gold Price Today : सोने पुन्हा तेजीत, जाणून घ्या आजचा १८ आणि २४ कॅरेटचा भाव
- येऊ कशी तशी मी नांदायला : ओम- स्वीटूच्या लग्नात विघ्न तर येणार नाही ना?
यावेळी तुपकर म्हणाले, पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. त्यांनी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्यातून सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा या कंपन्यांना फायदा झाला. कारणे सांगून शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे विमा प्रस्ताव नाकारले जात आहेत.
- आई कुठे काय करते: अरुंधती देशमुखांच्या घरात पुन्हा येणार का राहायला?
- लग्नाचं खोट वचन देऊन सेक्स : अलाहाबाद न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आहे?
विमा कंपन्यांनी गेल्या वर्षी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला नाही. त्याचबरोबर या वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किमान २५ टक्के नुकसानीची आगाऊ रक्कम दिली पाहिजे.
- पुणे : पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडला, घातपाताची चर्चा
- अफगाणिस्तान : तालिबानचा कब्जा; मलाला युसूफझई काय म्हणाली?
‘कृषी विभाग आणि विमा कंपन्यांचे साटेलोटे’
केंद्र सरकारच्या तशा सूचना आहेत. मात्र विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा दिलेला नाही, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांचे साटेलोटे आहे.
विमा कंपन्यांकडून गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढावी.
शेतकऱ्यांना पीक विमा येत्या १५ दिवसांत मिळाला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुण्यात आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
राज्य सरकारला जागे करणारे हे आंदोलन असेल आणि संपूर्ण राज्यातील शेतकरी आंदोलनांसाठीं एकवटतील, असेही ते म्हणाले.
- धुळे : ‘बंदिवानांनी तुरूंगवासानंतर जीवनात आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करावा’
- अटल बिहारी वाजपेयी : कवी मनाच्या पंतप्रधानांनी देशाला दिले ‘कणखर’ नेतृत्व
- आयपीएल स्टार राशीद खान : ‘अफगाणिस्तानमधून माझ्या कुटुंबाला बाहेर नेऊ शकत नाही’
- मुख्यमंत्री ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांना धमकी; मागण्या मान्य न केल्यास…
पहा व्हिडिओ :