अजित पवारांना भाषण करू न देणे अयोग्य; महाराष्ट्राची माफी मागा | पुढारी

अजित पवारांना भाषण करू न देणे अयोग्य; महाराष्ट्राची माफी मागा

पुणे : पुढारी ऑनलाईन : देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या शिळा मंदिराच्या लोकार्पण समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याचे प्रकरण चांगलेच चिघळले असून, ‘हा महाराष्ट्राचा अपमान आहे, पंतप्रधानांनी, भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी कँाग्रेस पक्षाने केली आहे.

या कार्यक्रमात मोदी यांच्या आधी देहूसंस्थानच्या अध्यक्षांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले; मात्र राज्याचे व्यासपीठावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भाषण करू देण्यात आले नाही. यात राज शिष्टाचाराचा (प्रोटोकॉल) भंग झाल्याचा दावा राष्ट्रवादी कँाग्रेसने केला असून, यासंदर्भात पंतप्रधान आणि भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी अशीमागणीकेली आहे.

बेराेजगारांसाठी खूशखबर : पुढील दीड वर्षांमध्‍ये १० लाख जणांना नाेकरी मिळणार ! पंतप्रधान मोदींनी दिले भरतीचे आदेश

यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना, उपमुख्यमंत्री कार्यालयाने पाठवलेल्या प्रस्तावास पंतप्रधान कार्यालयाने परवानगी दिली नसल्याचे सांगितले. अजित पवार केवळ राष्ट्रवादी कँाग्रेसचे नेते नाहीत, तर ते महाराष्ट्राचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भाषण करू देण्यास नकार देणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे त्या म्हणाल्या.

मिटकरी, दरेकर यांच्यात वादावादी

दरम्यान, या घटनेसंदर्भात एका वृत्त वाहिनीशी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अजित पवार यांना भाषण करू न देण्याच्या कृतीचे समर्थन करताना, ‘प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे योग्य नाही. हा कार्यक्रम राजकीय नव्हता. वारकऱ्यांच्या या कार्यक्रमात वारकऱ्याला बोलू दिलं ही बाब मोठी आहे. प्रोटोकॉलचा प्रश्नच नाही. देहू संस्थानने कार्यक्रम घेतला. पीएमओ कार्यालय ठरवत नाही कुणी भाषण करायचे’ असे स्पष्टीकरण दिले.

मद्यप्राशन करून एसटी चालविली तर चालक-वाहक सरळ बडतर्फ, राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय

दरेकरांच्या या वक्तव्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेत पंतप्रधान कार्यालयाने प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा दावा करताना, ‘अजित पवार यांना फडणविसांसारखी भाषणाची हाैस नाही. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना डावलून विरोधी पक्षनेत्याला भाषण करण्याचीसंधीदेणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात संताप व्यक्त केला. ‘भले ते देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी’ या तुकोबांच्या अभंगाचा हवाला देत त्यांनी या घटनेच्या विरोधात राष्ट्रवादी कँाग्रेस आवाज उठवेल असा इशारा दिला.

Back to top button