Prakash Ambedkar: ‘कदाचित या शेवटच्या निवडणुका असतील…’ प्रकाश आंबेडकर यांचा धक्कादायक दावा, नेमकं काय म्हणाले?

Prakash Ambedkar On Municipal Corporation Elections: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. या निवडणुकांत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarPudhari
Published on
Updated on

Prakash Ambedkar On Municipal Corporation Elections: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक विधान केल्याने चर्चांना उधाण आले आहे. “कदाचित या शेवटच्या निवडणुका असू शकतात,” असा दावा त्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांमध्येही संभ्रम आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महापालिका निवडणुकांमध्ये यावेळी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी परिस्थिती त्यांना दिसत नाही. “क्लिअर कट मेजॉरिटी कुणालाही मिळेल, असे चित्र नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. विविध ठिकाणी बिनविरोध नगरसेवक निवडून येण्याच्या प्रक्रियेबाबत जनतेत नाराजी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

त्यांच्या मते, बिनविरोध नगरसेवक ही प्रक्रिया लोकांना आवडलेली नाही. ही नाराजी मतदानावर परिणाम करू शकते, असे संकेत त्यांनी दिले. “हे सगळं मतदानात प्रतिबिंबित होण्याची शक्यता आहे,” असे आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar
Vote Counting Mumbai: मतमोजणीचा निर्णय पालिका आयुक्तांकडे; बोगस मतदारांवर थेट गुन्हा नोंदवणार

याचवेळी त्यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. “पोलीस खात्यात दबक्या आवाजात काही चर्चा सुरू आहे,” असे सांगत त्यांनी या चर्चेमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरत असल्याचे निरीक्षण मांडले. विशेष म्हणजे, ही चर्चा पोलीस विभागात असल्याने लोक अधिक चिंतेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“हा तिसरा घटक फारसा उघडपणे बोलला जात नाही, पण तो अस्तित्वात आहे. त्यामुळेच काही लोक म्हणत आहेत की या कदाचित शेवटच्या निवडणुका असतील,” असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनस्थितीवर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर किंवा निकालांवर दिसू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Prakash Ambedkar
North Mumbai BMC election: उत्तर मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू थेट सामना; परप्रांतीय वाढीमुळे राजकीय गणिते बदलणार

प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे महापालिका निवडणुकांपूर्वीच राजकीय चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे. त्यांच्या दाव्यांवर विविध पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतात आणि याचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news